गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.
प्राजक्ताच्या झाडाकडे पाहून त्याच्याविषयी मत बनवणारा वेडाच म्हणायचा......प्राजक्ताचे फूल पाहिल्याशिवाय त्याच्या सौंदर्याची कल्पना येत नाही. साक्षात सत्यभामा आणि रुक्मिणीच्या मनात आकर्षण निर्माण करणारे हे दैवी फूल!! त्या फुलाचे नाव घेऊन जालनिशीचा हा उपक्रम सुरु केला आहे. तुमच्या सहभागाने आणि सहकार्याने तो यशस्वी होईल यात शंका नाही.
Sunday, June 22, 2014
Wednesday, June 27, 2012
बळी................
नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......
Thursday, May 3, 2012
एक होता रोमेल
=========================================================================================
आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.
-विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर)
=========================================================================================
१९४४ चा ऑक्टोबर थंडीचा विलक्षण कडाका दाखवत होता. संपूर्ण युरोप बर्फाच्या साम्राज्याखाली आला होता. नजर जाईल तिथपर्यंत केवळ पांढरे आच्छादन दिसत होते. पण या साम्राज्याची कोणालाही तमा नव्हती. गेली आठ वर्षे युरोपच नव्हे तर संपूर्ण जग एकाच माणसाच्या राक्षसीपणात पोळून निघाले होते. त्याच्या साम्राज्याचा अंत केव्हा होणार हा एकच प्रश्न सध्या महत्वाचा होता. कोणतेही युद्ध आपल्याबरोबर संहार आणि सूडभावना घेऊन येते. पहिल्या महायुद्धानंतर सूडभावनेने पेटून उठलेल्या जर्मनीने गेले सहा -आठ वर्षे संहाराचे रूप धारण केले होते.
Monday, January 16, 2012
भक्ती
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||
Sunday, April 17, 2011
लेखनसीमा
लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ?
Subscribe to:
Posts (Atom)